1. “खोटारडा जेव्हा खरं बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”
2. “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा.”
3. “यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”
4. “आयुष्य सहज सोपं जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”
5. “अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”
6. “मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”
7. “चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्ध सार असते.”
8. “जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”
9. “मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”
10. “गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”
11. “विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटणं.”
12. “दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”
13. “खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”
14. “ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”
15. “खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”
16. “संधीशिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”
17. “निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”
18. “शहाण्याला शब्दांचा मार.”
19. “तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”
20. “करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”
21. “रिकामे डोके शैतानाचे घर असते.”
22. “संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”
23. “ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”
24. “मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”
25. “चकाकते ते सर्व सोन नसते.”
26. “कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”
27. “जुना मित्र हा नव्या वास्तूसारखा असतो.”
28. “खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.”
29. “संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”
30. “कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”
31. “वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”
32. “लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”
33. “नास्तिकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.”
34. “बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”
35. “सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”
36. “विश्वास ठेवा चुकीतूनही चांगले निष्पन्न होते.”
37. “जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”
38. “अंधश्रद्धेपेक्षा मौन कधीही चांगले.”
39. “एक मिनीट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”
40. “चरित्र हाच खरा इतिहास असतो.”
41. “ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.”
42. “चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.”
43. “चारित्र्य म्हणजे नियती.”
44. “चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.”
45. “दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.”
46. “विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.”
47. “प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.”
48. “आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.”
49. “श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.”
50. “मैत्री म्हणजे समानता.”
51. “मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.”
52. “परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.”
53. “भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.”
54. “सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.”
55. “कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.”
56. “थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.”
57. “मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”
58. “महान माणसांची मते साधी असतात.”
59. “जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.”
60. “मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.”
61. “सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.”
62. “जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.”
63. “जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.”
64. “स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.”
65. “आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”
66. “इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”
67. “इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.”
68. “जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.”
69. “स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.”
70. “जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”
71. “वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.”
72. “कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.”
73. “सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.”
74. “वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.”
75. “पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”
76. “द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.”
77. “माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.”
78. “मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.”
79. “ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”
80. “ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”
81. “श्रम हेच जीवन.”
82. “संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.”
83. “जीवन हे फूल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.”
84. “जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.”
85. “सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”
86. “माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”
87. “दुसऱ्याला शिकवित असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”
88. “द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.”
89. “संयम हेच खरे औषध.”
90. “पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.”
91. “संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”
92. “जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.”
93. “निसर्ग हाच खरा कायदा.”
94. “दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.”
95. “मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.”
96. “नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.”
97. “एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.”
98. “संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.”
99. “उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.”
100. “पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.”
101. “जबाबदारी पडली की ती शिकवतेच.”
102. “धडपडीनंतर विश्रांती सुखकर असते.”
103. “श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.”
104. “स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”
105. “मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”
106. “खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”
107. “विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”
108. “जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”
109. “माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”
110. “दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”
111. “संशयातून संशयच उत्पन्न होतो.”
112. “जो बदलत नाही तो असमंजस असतो.”
113. “प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.”
114. “कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.”
115. “सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”
116. “इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”
117. “फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”
118. “या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”
119. “श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”
120. “वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.”
121. “माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.”
122. “सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.”
123. “अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”
124. “उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”
125. “जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”
126. “दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”
127. “तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”
128. “श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”
129. “द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”
130. “दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”
131. “आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”
132. “साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”
133. “उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”
134. “चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”
135. “सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”
136. “श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”
137. “माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”
138. “घाबरटाला सारेच अशक्य असते.”
139. “सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”
140. “एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”
141. “सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.”
142. “सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.”
143. “आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.”
144. “कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.”
145. “माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.”
146. “जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो”
147. “स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही”
148. “जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.”
149. “जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”
150. “पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”
151. “काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”
152. “जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”
153. “जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”
154. “रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”
155. “सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”
156. “आपण श्रद्धेवर जगत असतो.”
157. “भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”
158. “लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”
159. “मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”
160. “श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”
Sunday, 31 December 2017
सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह
मन:शांती मिळविण्याची 10 तत्वे
1) दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका :
अनेकदा आपण दुसऱ्याच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !
2) क्षमा करा आणि विसरून जा :
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणाऱ्या वा आपल्याला दुखविणाऱ्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातूनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.
3) स्तुतीपुंजक बनू नका :
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणाऱ्यांना
जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.
4) द्वेष करू नका :
द्वेष करणाऱ्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखित होते. विधीलिखित टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दुसऱ्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होऊन जाईल.
5) प्रवाहाबरोबर चाला :
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.
6) संकटांचा धैर्याने मुकाबला करा :
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवून घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरिक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाजवळ नेईल.
7) अंथरूण पांघरून हातपाय पसरा :
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येईल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल.
8) नित्यनेमाने ध्यानधारणा करा :
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणाऱ्या
विचारांपासून तुमची सूटका होते. यातून तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.
9) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा :
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातून तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.
10) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका :
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाईल व डोक्याला ताप मात्र होईल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातूनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उकरू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !
Tuesday, 26 December 2017
भारतातील जागतिक वारसा स्थाने
1. आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
2. फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
3. ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश
4. जुना गोवा
5. सांची स्तूप, मध्य प्रदेश
6. खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
7. भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
8. चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
9. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
10. एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
11. अजिंठा लेणी, महाराष्ट्र
12. वेरूळ लेणी, महाराष्ट्र
13. चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू
14. महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
15. हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
16. पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
17. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
18. मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
19. केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
20. कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा
21. महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
22. भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
23. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
24. कुतुब मिनार, दिल्लीलाल किल्ला, दिल्ली
25. हुमायूनची कबर, दिल्ली
26. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
27. नालंदा विद्यापीठ(महाविहार), बिहार
28. खांगचेंडझोंगा राष्ट्रीय अभयारण्य, सिक्कीम
29. कैपिटल इमारत संकुल, चंदीगड
Friday, 22 December 2017
शिक्षणाचे महत्त्व
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे .
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते खरी समस्या ही आहे की वास्तविक ’शिक्षण’ म्हणजे काय लोकांना ह्याची कल्पना नाही. एखाद्या जमिनीचे किंवा एखाद्या वस्तुचे मोल मोजावे स्टॉक एक्सचेंज बाजारातील आपल्या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण शिक्षणाचे मूल्यांकन करतो. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र शिकलेल्यांच्या चारित्र्याचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो.
शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परीक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते, … शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही. त्यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे. आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे. विकासकार्यात समाज्यातील प्रत्येक वर्ग जोपर्यंत सहभागी होत नाही . आपल्या प्रजासत्ताकाच्या राज्य घटनेला साठ वर्षे होत आली तरीही, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, समान सामाजिक न्याय, समान संधी आणि समान नागरी कायदा ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या पुस्तकातच राहिली आहेत. संपूर्ण देश साक्षर व्हावा, सर्वांना हव्या त्या शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले आहेत आर्थिक विकासात शिक्षणास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. निरनिराळे विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून मानवी भांडवल निर्माण करण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील शिक्षणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन शिक्षण विषयक कार्यक्रम राबविले जातात. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊनच राज्य शासन सर्वसाधारण शिक्षणावर मोठा खर्च करतो
शिक्षणक्षेत्र गेल्या साताठ महिन्यांपासून या ना त्या कारणाने विशेष चर्चेत आहे. अर्थात राष्ट्रीय जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असणे उचितच आहे.गेली दहा वर्षे संसदेच्या शिक्कामोर्तबाची वाट पाहात असलेले शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक. सहा ते चौदा वर्षे या वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे, हा त्याचा हक्क आहे. त्याला शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यात कसूर झाल्यास कायद्याने शिक्षा होण्याचे प्रावधान आहे. शाळांवरही अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची तरतूद विधेयकात आहे. संविधानात मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात राज्यसंस्थेचे कर्तव्य म्हणून सर्वांना शिक्षणाची तरतूद होती, पण स्वातंत्र्यानंतर अर्धशतक उलटूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांची संख्या खूप मोठी आहे. म्हणूनच शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यासाठी सक्तीचे व निःशुल्क शिक्षण चौदा वर्षे वयापर्यंत प्रत्येक भारतीयाला मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक ठरले. अर्थात केवळ कायदा करून निरक्षरतेची समस्या चुटकीसरशी सुटेल, अशी अपेक्षा नाही. एका स्वयंसेवी संस्थेच्या गेल्या वर्षाच्या अभ्यासानुसार भारतात किमान तीन कोटी मुलांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. शाळेची फी न भरल्यामुळे शाळा सोडणाऱ्यांची संख्याही सुमारे तीन कोटी आहे. आठव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थी गळतीचे प्रमाण चौपन्न टक्के आहे. दलित मुलींपैकी दहावीआधीच ऐंशी टक्के शाळा सोडतात तर आदिवासी गटातील मुलींपैकी शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्यांचे प्रमाण नव्वद टक्के आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा हक्क कायद्याने मिळूनही त्याचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी देशाला दृढ संकल्प करून त्याची पूर्ती करण्यासाठी निर्धाराने काम करावे लागेल.
संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती/दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता, शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्रशासक, विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती आणि जिज्ञासा हवी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करतानाच उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यावरही सरकार भर देत आहे. कालानुरूप नवीन विषय, नवे अभ्यासक्रम, आवश्यक साधनसुविधा, नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे. कारण बदल स्वीकारणे सहजरीत्या घडत नाही. असे बदल घडवताना अनेक निर्णय घ्यावे लागतात. शिक्षणक्षेत्रात बदलांची गती खूप कमी आहे. शिक्षण राष्ट्रनिर्मितीचे, विकासाचे प्रमुख साधन म्हणून महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे, जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. धोरणात्मक निर्णय आणि घोषणा यांच्यापुढे प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयोग यांना महत्त्व आहे.
पालक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका या कामी बहुमोलाची आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे. शाळांच्या पालक-शिक्षक संघातून, गावच्या ग्रामशिक्षण समित्यांतून अशा निर्णया-घोषणांवर, ध्येयधोरणांवर मोकळी चर्चा हवी. कारण
शैक्षणिक ध्येयधोरणांत आणि निर्णयप्रक्रियेत जनसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत. जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता येत नाही. यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्क आहे.
महाराष्ट्राच्या या सुवर्णमंगल वर्षात जनतेला आणि सरकारला एक कळकळीचे आवाहन आहे की , उत्तम दर्जाचे आणि सर्वांसाठी शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय असायला हवे. महाराष्ट्रात जन्मलेल्या , किंबहुना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असला तरी तो वास्तवात उतरायला हवा. जसे प्रत्येकाला अन्न मिळायला हवे तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळायलाच हवे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आणि समाज अशा दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण” हेच आहे.
डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...
-
1. Lion – Den – (सिंह – गुहा) 2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल) 3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ) 4. Sheep – Pen – (मे...
-
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा. 2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर. 3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक...
-
A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३...