'अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात.
‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा अलंकार आहे’, हा सुविचारही प्रसिद्ध आहे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात –
सुवाच्य
ब्राह्मणें(बालके)बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ।।
अक्षरमात्रतितुकेंनीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट ।आर्कुलींवेलांट्या ।।
-दासबोध,दशक १९, समास १, ओवी १, ३
अर्थ : मुलांनी प्रत्येक अक्षर घोटून घोटून म्हणजे सराव करून सुंदर करावे. अक्षर पाहून चतुर व्यक्तींना समाधान वाटेल, एवढे ते सुंदर असावे. प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे. प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. काने आणि आडव्या मात्राही नीट असाव्यात. त्याचप्रमाणे रफार आणि वेलांट्याही नीट काढाव्यात.
हस्ताक्षर चांगले होण्यासाठी काय करावे ?
१. अक्षरे शांतपणे आणि एकाग्रतेने काढावीत.
२. हस्ताक्षर गोल आणि वळणदार काढावे.
३. दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
४. प्रतिदिन दुरेघी वहीत ५ ओळी तरी शुद्धलेखन लिहावे.
५. चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.
६. लिहिण्यासाठी शक्यतो निळ्या शाईची लेखणी (पेन) वापरावी.
Monday, 4 December 2017
वळणदार आणि सुवाच्च हस्ताक्षर काढावे कारण..
Subscribe to:
Post Comments (Atom)
डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...
-
1. Lion – Den – (सिंह – गुहा) 2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल) 3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ) 4. Sheep – Pen – (मे...
-
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा. 2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर. 3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक...
-
A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३...
No comments:
Post a Comment