Monday, 4 December 2017

वाचाल तर वाचाल


मित्रानो,
वाचनाचे महत्व तसे शब्दात सांगणे फारच कठीण आहे. समर्थ रामदासांनी मात्र ते
नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे.
ते म्हणायचे
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।।

आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे. याचा परिणाम वाचन कमी होण्यात होत आहे.
रे ब्रॅडबरी या विचारवंताने म्हंटले आहे.
"You DON’T Have To Burn Books To Destroy a Culture,
Just Get Peoples To Stop Reading Them".
म्हणूनच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र पुढे येणे अत्यंत आवश्यक झाले आहे
कोणत्याही ज्ञानशाखेला सतत अद्यावत राहण्यासाठी सतत वाचनाशिवाय पर्याय नाही.
वाचन हे केवळ मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी असू नये.
तर ज्ञान प्राप्ती हा त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. ग्रंथाना गुरु म्हंटले आहे ते याच अर्थाने.
मार्गारेट फुलर म्हणतात कि,
Today A Reader, Tomorrow A Leader.
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,
नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला अन्य पर्याय नाही. पण आजच्या मोबाईल, इंटरनेटच्या युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
खर तर मानवी जीवनात लेखक महत्वाची भूमिका बजावतात. एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी
अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डा. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात -
"पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञान बरोबर नेहमीच आनंद मिळालाय. माझ्या घरात
सुमारे ५० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म,विज्ञान,प्रशासन,इतिहास,भूगोल,
व्यवस्थापन आणि वाड्मय अश्या विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझे ग्रंथ संग्रहालय ही माझी
सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे. आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे".
प्रगत विकसित देशात युवकांच्या वाचनाचा आढावा नेहमी घेतला जातो.
कारण
वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. उगाच नाही म्हणत की
"युवक वाचतील तर देश वाचेल"
म्हणून
पुस्तकांशी मैत्री करूनच टाकू या
वाचनाच्या खेळात रंगूनच जाऊ या
ज्ञानाचे बाळकडू घोळून घोळून पिऊ या
चांगल्या चांगल्या गोष्टी निवडून निवडून घेऊ या
तेव्हाच तर आपण
योग्य विचार करायला शिकू
विचारांना गती द्यायला शिकू
स्वतःचे मत मांडायला शिकू
स्वतःचे स्वत्व शोधायला शिकू
चला तर मग
सुरूवात आजपासूनच करू या
चला तर मग
सुरूवात आपल्यापासूनच करू या
उत्तम वाचक बनण्याची आताच शपथ घेऊ या
वाचन संस्कृतीचा जोपासण्याचा विडाच उचलू या
वाचन संस्कृतीचा जोपासण्याचा विडाच उचलू या








No comments:

Post a Comment

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...